महामार्गावर वेगाने गाडी चालवत जाताना धम्माल येते, हो ना? पण महामार्ग जेव्हा प्राण्यांना जीवघेणे ठरतात तेव्हा? रस्त्यावर झालेले प्राण्यांचे मृत्यू लवकरच विस्मृतीत जातात, आणि नवीन मृत्यू होतात तेव्हाच परत उजेडात येतात, जंगलांमधून व अभयारण्यांतून लोक निष्काळजीपणे वाहने चालवतात आणि निर्लज्जपणे परिस्थितिकीचा ऱ्हास होईल अश्या कृती करत राहतात. ही खचितच गमतीची गोष्ट नाही.
मंगळावरील प्राचीन नोआकियन कालखंडातील (सुमारे ४०० कोटी वर्षांपूर्वी ) उष्ण-आर्द्र हवामान हळूहळू बदलत जाऊन हेस्पेरियन कालखंडापर्यंत (सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी) शीत व हिमाच्छादित बनले असे तेथील दऱ्यांच्या प्रदेशातील नव्या पुराव्यानुसार सिद्ध झाले.
Mumbai/