आयआयटी मुंबईद्वारे विकसित नवीन डीप-लर्निंग फ्रेमवर्क SpADANet (स्पाडानेट) मर्यादित लेबल्स वापरूनही अनेक चक्रीवादळांमधील संरचनात्मक नुकसान अधिक अचूकपणे वर्गीकृत करू शकते.

IIT Bombay

मुंबई

१९७५ ते २०१४ या कालखंडातील माहितीच्या विश्लेषणातून आयआयटी मुंबई आणि हैदराबाद विद्यापीठातील संशोधकांनी कृषी क्षेत्रातील गेल्या ४० वर्षातील तीन टप्प्यांमधील बदलांचा मागोवा घेतला आणि त्यात असे दिसून आले की भारतातील अर्ध-शुष्क उष्णकटिबंधातील कृषी उत्पादनक्षमता शेतजमिनीच्या आकारापेक्षा आवश्यक संसाधनाची उपलब्धता, पत किंवा कर्ज आणि बाजारपेठा या घटकांवर अवलंबून आहे.

Mumbai

संगणक करत असलेल्या दूरस्थ प्रतिमांचे विश्लेषण आणि बोली भाषेत दिलेल्या सूचना यांच्यामधील दुवा बनले आयआयटी मुंबईचे नवीन AMVG मॉडेल.

मुंबई

आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी विकेंद्रित वाहतूक नियंत्रण प्राणलींचे परीक्षण करण्यासाठी नेटवर्क सिद्धांतावर आधारित कार्यक्षम संगणन करणारी गणितीय पद्धत प्रस्तावित केली.

मुंबई

सूक्ष्मजंतूंवरील प्रयोगांतून संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये उत्क्रांतीची नक्कल घडवून आणली आणि त्यांना किंचित वेगळ्या शर्करा देऊन त्यांच्या अनुकूलनात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला.

मुंबई

अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Mumbai

हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि संगणकीय प्रतिमान यांचा वापर करून संशोधकांनी जिल्हा-उपजिल्हा पातळीवर कार्यक्षम जलसिंचन व्यवस्थापन पद्धती विकसित केली.

Mumbai

सापाच्या शरीरातून प्रवास करणाऱ्या एका साध्या बलाने S-स्टार्ट गतीसारख्या क्लिष्ट हालचालीची हुबेहूब प्रतिकृती तयार करता येते हे दाखवणारे संगणकीय प्रतिरूप तयार करून संशोधकांनी S-स्टार्ट गतीवर अधिक प्रकाश टाकला आणि उत्क्रांतीशी संबंध सूचित केला.

मुंबई

कोलाजेनमुळे स्वादुपिंडात संप्रेरकांच्या गुठळ्या होण्याचा वेग वाढतो, हे यापूर्वी माहित नसलेले मधुमेहाचे कारण उघडकीस आणून आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी नवीन संभाव्य औषधनिर्मितीचा वेध घेतला.

Mumbai

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी गोठवणाऱ्या थंडीत ऊब मिळण्यासाठी रसायनशास्त्राच्या मदतीने सूर्यप्रकाश साठवणे शक्य असल्याचे दाखवले.

Search Research Matters